व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फॉर्म भरूनही पैसे आले नाहीत का | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तक्रारी कशा कराव्यात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महिलांना येणाऱ्या अडचणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. परंतु, काही महिलांना अर्ज करताना आणि बँक खात्यात पैसे येण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. काही महिलांचे अर्ज फॉर्म भरताना त्रुटी झाल्यामुळे अमान्य झाले आहेत, तर काहींना अद्याप त्यांच्या खात्यात पैसे मिळालेले नाहीत. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे, याबद्दल माहिती घेणे अत्यावश्यक आहे.

अर्ज अमान्य झाल्यास काय करावे?

काही महिलांचे अर्ज काही कारणांमुळे अमान्य केले गेले आहेत. अशा महिलांनी अर्जात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. ही दुरुस्ती कशी करावी, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी काही साधने उपलब्ध आहेत.

तक्रार कुठे करावी?

जर महिलांना अर्ज करताना किंवा पैसे खात्यावर येताना काही अडचणी येत असतील, तर त्यांची तक्रार नारी शक्तीदूत अॅपवर नोंदवू शकतात. हे अॅप तक्रारींची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेले आहे. याशिवाय, महिलांनी त्यांच्या स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकतात.

महिलांना आर्थिक मदत कधी मिळेल?

या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील 3000 रुपये काही महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत. या योजनेत अर्ज केलेल्या सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक महिलांचे अर्ज सध्या तपासण्यात येत आहेत.

हे वाचा 👉  1 मार्चपासून लागू होणाऱ्या तिकीट बुकिंगच्या नव्या प्रणालीची संपूर्ण माहिती |Indian Railway Change General Ticket Rule

तक्रार सोडवण्याची प्रक्रिया

तक्रार नोंदवण्यासाठी नारी शक्तीदूत अॅपचा वापर करावा. या अॅपवर तक्रार नोंदवल्यानंतर ती तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली जाईल आणि तक्रारदारांना त्यांच्या समस्येचे निराकरण मिळेल. अंगणवाडी सेविका महिलांच्या तक्रारी शासनाच्या संबंधित विभागाकडे पोहचवतात आणि तक्रार सोडवण्यासाठी मदत करतात.

याप्रकारे महिलांनी या योजनेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य ठिकाणी तक्रार नोंदवावी आणि आवश्यक ती मदत मिळवावी.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page