व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

33 हजार 356 शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा होणार, करावे लागणार हे काम

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हजारो शेतकऱ्यांना आर्थिक कर्जमुक्ती मिळाली आहे. या योजनेतून राज्यातील 14.38 लाख शेतकऱ्यांना तब्बल 5,216 कोटी 75 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. परंतु, 33,356 कर्जखाते धारकांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण न केल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. या शेतकऱ्यांना तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे सहकार विभागाने आवाहन केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली गेली, परंतु याच दरम्यान कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे योजनेची अंमलबजावणी काही प्रमाणात थांबली. या सरकारला सत्ता सोडावी लागल्यानंतर नवीन सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, 2017-18, 2018-19, आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

सिबिल स्कोर चेक करा. Check CIBIL score

कोणतेही कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर 600 च्या वर असणे आवश्यक आहे.

राज्यातील विविध बँकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यातील 4.90 लाख खाती आयकर दाते आणि पगारदार व्यक्तींची असल्यामुळे अपात्र ठरली. याशिवाय, 8.49 लाख कर्जखात्यांनी केवळ एका आर्थिक वर्षातच परतफेड केल्यामुळे त्यांनाही अपात्र ठरविण्यात आले. तथापि, पात्र ठरलेल्या 15.44 लाख खात्यांपैकी 15.16 लाख खाती आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेतून गेली. त्यातील 14.40 लाख खात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले, आणि 14.38 लाख खातेदारांना ही रक्कम वितरित करण्यात आली.

हे वाचा-  लाडकी बहीण योजना: शासनाने पाठवला १ रुपया, आला नाही का तर करा हे काम!

शेतकऱ्यांनी काय करावे?

अद्याप आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33,356 खातेदारांना त्वरित त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे सहकार विभागाने सूचित केले आहे. आधार प्रमाणीकरणानंतरच या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. योजनेची अंमलबजावणी महाआयटीकडून संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे, ज्यामुळे लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा होईल.

शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरित करून, योजनेचा लाभ मिळवावा, असे सहकार विभागाने आवाहन केले आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment